Monday, February 14, 2011

इच्छा

आयुष्या संपण्यावर आले तरी इच्छांची यादी काही संपत नाही. तसे पाहिले त त्यावेळीही "जगावं" हि इच्छाच. शेवटी इच्छा हि कधी शेवटची नसतेच. ती पूर्ण झाली कि नवीन पण शेवटची(?) इच्छा तयार होते. पण मग ती शेवटची असल्याने सर्वांसाठी जे त्या इच्छेशी निगडीत आहेत त्यांवर बंधनकारक. बर असे असूनही शेवटच्या इछेची खासियत अशी कि कमाल वेळेस दुसऱ्याच्या इछेचा बळी घेऊनच तिचा जन्म होतो.
नवल याचं कि पिंड दानाच्या वेळी, कावळा शिवला हे एखाद्याच्या इच्छापुरती चे द्योतक. तसं पाहिले तर एखादी इच्छापूर्ती हि दुसऱ्या इछेची जन्मवेळ. मनुष्याचं मन एवढ सैरावैरा धावते कि त्यात कोणत्या इछेचा कधी जन्म होईल हे सांगण तितकच कठीण जेवढ कोणत्याही गोष्टीचे भविष्य.  कोणत्याही इच्छेची खोली सांगण कठीण जशी डोळ्यातली खोली सांगण. कोणत्याही इछेची वेदना सांगण तेवढाच कठीण जेवढी अथांग सागराची.

आठवणी

आयुष्यातल्या किती आठवणी सूर्यफुलाच्या बियांसारख्या गोड असतात. त्या बियांची टरफले काढून आतला गर खायचा असतो. तसे पाहिले तर जीवन सुद्धा सूर्यफुला प्रमाणे आहे, सूर्याच्या कलेप्रमाणे जसे सुर्यफुल रुख बदलते तसेच मनुष्याचे जीवन काळाच्या वेधाने रुख बदलणारे. प्रत्येक आठवणीतील गोडपणा तसा वेगळाच आणि काही आठवणी काही बियांसारख्या कडू; थुन्कल्यावरही कडूपणाची चव सोडून जाणाऱ्या. प्रत्येक आठवणीत एक पोकळी; कधीच न भरून निघणारी. काळाच्या ओघात काही बिया वाऱ्या-वादळांनी खाली पडतात तर काही अजून दृढ बनतात; तसेच आठवणींचे. काही सुर्यफुल लहानपणीच कोमेजतात तर काही भरधाव वेगानी सर्वांच्या पुढे जाऊन स्वतःला जास्त भरतात; तसेच प्रत्येकाच्या आयुष्याचे. काही बालपणीच्या आठवणी जश्या गहाळ होतात, लक्षात राहातच नाहीत, कधी आठवतच नाहीत तशी सूर्यफुलाच्या मध्याशी असलेली रिकामिजागी, कितीही इच्छा असली तरी कधी न भरणारी. एका गुणधर्माची पण त्याच प्रमाणे दुबळेपणाची जाणीव करून देणारी. जीवनाचा गाभारच पोकळ असल्याची सतत जाणीव करून देणारी. आणि एखाद सुर्यफुल, कितीही खाली दबलं तरी सूर्यप्रकाशात येण्याची आकांक्षा असणारं, कदाचित नेहमी असफल प्रयत्न करणारं......

अडचण

माणसाला स्वतःच्या आयुष्याबद्दलही जरी काही करायचे असले तरीही 'कोणाला काय वाटेल?' हा विचार  मनात  आल्याशिवाय तो ते करू शकत नाही. आणि त्यामुळेच कित्येकदा जरी वाटत असले कि आयुष्यातला कोणताही बरा वाईट क्षण लिहावा, काहीतरी कराव; पण ते शक्यच होत नाही, लिहिल्या/ केल्या जातच नाही. काही गोष्टी अशा असतात की ज्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या काही व्यक्तींशी निगडीत असतात, काही गैरसमाजांनी गोवल्या गेलेले असतात. आपल्याला झालेला समज आहे कि गैरसमज हे सुद्धा सांगण्या इतपत हिम्मत नसलेला प्राणी म्हणजे 'माणुस' होय. कारण तो समज आहे की गैरसमज; बरोबर आहे की चुक याची त्याला स्वतःला सुद्धा योग्य प्रकारे जाणीव झालेली नसते.
               गलितगात्र होऊन स्वतःच्या विचारांशी स्वतःच लढून नामशेष होणे हेच मनुष्याच्या जीवनाचा आखून दिलेला मार्ग असतो. आखून दिलेल्या चाकोरीच्या बाहेर जाण्याचा कमी अधिक प्रमाणात सर्वच जण प्रयत्न करतात आणि चक्रव्युहात फसून 'मेढरांच्या कळपासारख चाकोरीतूनच चला' हा जीवनाचा आशय असल्याचा संदेश देतात. कोणी दुसऱ्या वाटेन जाण्याचा प्रयत्न जरी करत असेल तरी त्याला स्वतःच्या आयुष्यातील आलेल्या अडचणी सांगून, कधी भावनांनी, कधी भौतिक सुखाच आमिष देऊन त कधी लादलेल्या जबाबदार्यांच्या ओझ्या खाली दाबून 'त्याच्या वैयक्तिक किंवा कोणाच्याहि स्वार्थासाठी' त्या चाकोरीच्या बाहेर न जाऊ देण्याचा केविलवाणा प्रकार केल्या जातो. कदाचित त्यांच्या वरही तोच लादण्यात आल्याने किंवा समाजाच्या 'हि' पद्धतच अंगवळणी पडल्याने हे घडत असावे. बदल हा सृष्टीचा नियम आहे तो या प्रकारातच का चुकवा?
             दिवसेंदिवस कोणत्याही नात्यातला भाव हा प्रेमापेक्षा स्वार्थाकडे जास्त कललेला काही काळापासून दिसत असला तरी आता भासायला लागला आहे. शेवटी कोणत्याही अपत्याचा जन्म हा जसा प्रेमातून होतो तसा त्यामागे स्वार्थ (भौतिक आणि मानसिक) हा असतोच. त्यामुळेच कदाचित 'स्वार्थ' प्रत्येकाच्या अंगवळणी पडत असेल व प्रत्येकाला भोगावे लागत असेल. अडाणी, शिक्षित आणि सुशिक्षित यांमध्ये फरक काय तो हाच कि ज्यांच्या दैनंदिन गरजा आणि स्वार्थाची पातळी अनुक्रमे जास्त प्रमाणात वाढत जाते. अर्थात काही अपवाद असतात. अगदी
कोणाकोणात स्वार्थ नसतोच असे नाही.
पण त्या लोकांना अपवादाच्या यादीत जाण्यापासून परावृत्त करण्याचे श्रेय घेण्यासाठी 'हि' काही लोक धडपड करतात; या समाजाच्या चांगल्या अंगाचा हा किती दुर्दैविपणा !

Friday, February 11, 2011

थोडं तिरपं-तारप

माणूस कोणत्याही गोष्टी शिवाय राहू शकतो पण एका गोष्टी शिवाय नाही आणि ती म्हणजे "सवय". बऱ्याच गोष्टीची माणूस सवय करून घेतो किंवा न कळत होते. माणसांची, खाण्याची, पिण्याची, रडण्याची, मरण्याची.....वगैरे. सवयी सारखी प्रेमळ, घातक आणि तितकीच चवदार गोष्ट दुसरी अशक्यच !!

निर्जीव आणि सजीव वस्तूंमध्ये मला असं वाटते दोनच फरक आहे; सजीव बोलू शकतात, निर्जीव नाही आणि निर्जीव सगळ्यांवरच प्रेम करतात; सजीव नाही. प्रत्येक सजीवाचा जन्म प्रेमातूनच होतो. मग तो मनुष्य असो किंवा प्राणी असो. पण वर्चस्व किंवा ताकद या कारणांमुळे तो आयुष्यभर आपल्या जन्माच्या मुळाला समांतर चालतो. कधी छेदतच नाही.

माणसाची फारच क्षुल्लक पण सगळ्यात जास्त त्रास देणारी इच्छा म्हणजे स्वतःला ऐकून घेण्याची. प्रत्येक समोरच्या माणसात प्रत्येक माणूस एकच गोष्ट शोधत असतो 'त्याला ऐकून घेणारी, सहन करणार व्यक्ती.'

हिरा हा कृत्रिम आहे आणि मोती हा नैसर्गिक. मोती हा मुळातच सुंदर, निसर्ग निर्मित, धीरगंभीर,  शांत  आणि  तेवढाच आकर्षक. विरक्त, दृढ़निश्चयी पण नेहमीच एकाकी आणि बंदिस्त. पण हिऱ्याला तासल जात. पैलू पडले जातात, त्यावर मेहनत घेतली जाते आणि मग तो हिरा बनतो. मुळात तो दगडच असतो तोही काळा.

Friday, February 4, 2011

संध्याकाळ

जीवनतील काही चुकून झालेल्या, काही 'समजुन' केलेल्या 'चुकां' बद्दल बरेचदा वाईट वाटते. अर्थात ही गोष्ट सगळे सांगत नसतील तरी सगळ्यांनाच त्याचे वाईट वाटत असते. फक्त चुकां बद्दलच नव्हे तर आपल्या कमी पडलेल्या प्रयत्नांची आठवण
झाल्यावर असो किंवा अपयशा बद्दल असो, खोट बोलाव लागलं त्यापेक्षाहि  काहीही कारणास्तव खोट बोललो असेल त्याबद्दल असो किंवा कोणाला निरपेक्ष केले असेल त्याबद्दल असो. अशा साठी  प्रत्येक इसमाला उभ्या हयातित कधी ना कधी वाईट वाटतेच. ज्या प्रमाणे सुर्याच्या उष्णतेची सर सकाळपासून रात्रि पर्यंत, उत्तरायणा पासून दक्षिणायना पर्यंत बदलत जाते तसेच माणसाच्या मनोबलाची, अहंकाराची , भावनेची अणि हिम्मतिची सर कमी जास्त होतेच. आणि बांध कधी ना कधी तुटतोच. त्या वेळेस जवळच्या वाटणाऱ्या  दोनच गोष्टी; पहिली आई अणि दुसरी एकांत, निरागस संध्याकाळ !!

दिवसाच्या प्रत्येक प्रहरामधे एक वेगळी शक्ति असते, एक वेगळा आनंद असतो, वेगवेगळ्या विषयावर बोलण्याची ताकत असते. पण जीवनातिल प्रत्येक क्षणाशी, तो आनंदाचा असो वा दुखाचा, प्रणयाचा असो वा विरहाचा, किंवा केलेल्या चुकीचा असो त्या विषयी आपल्याशी बोलण्याची ताकत फक्त एकाच प्रहारत असते अणि तो प्रहर म्हणजे संध्याकाळ !

कधी व्यथा मनस्थितीत अशाच संध्याकाळी पाणावलेल्या डोळ्यांनी सुर्यनारायाणाकडे बघत असतांना एक विचार चमकून जातो की आसवांचा थोडा कमी ओघ वाहण्यासाठी त हा सूर्य रोज संध्याकाली प्रेमळ होत नसेल ना? त्याचा तो शेंदरी  रंग जे त्यागाच प्रतिक आहे  ते "तुझे दुःख त्यागुन दे" हे त खुणावत नसेल?

विश्व

विश्व म्हटले की नेहमी  पूर्ण भौतिक विश्व समजल्या जाते.. खर तर विश्वाची व्याख्या बनवणारे, समजावून देणारे, समजणारे, सांगणारे, उमजणारे सगळे विचारच असतात.

मला असे वाटते, मानवाने विचारांनी विणलेला  स्वकेन्द्रित कोष म्हणजे विश्व. कोश कुठे लांब कुठे आखुड, कुठे विरळ कुठे जाड. त्या कोश विणण्याच्या मर्यादे नुसारच दुसऱ्यांचे मूल्यमापन करायचे. त्या विश्वात आपल्या कोशाची स्वपरीक्षा न घेता, मर्यादा न परिक्षता, कोशाच्या बाहेर न निघून , दुसऱ्याच्या
कोशाशी एकरूप, मग्न न होउन मूल्यमापन करणे वा निर्णय देऊन मोकळे होणे हेच मुख्य  मानवाचे कर्म.

या विश्वात कमाल प्राणी आपला कोश मोठा करण्या ऐवजी दुसऱ्याचा किती लहान यामधे व्यथा
शक्ती खर्च करतात. ज्या विश्वाची जाणीव असायला पाहिजे त्या जाणिवेपासूनच दूर पळतात व शेवटी स्वतः चा कोश परिपक्व होण्याआधीच उघडे पडतात. अशा वेळेस; मर्यादेची जाणीव नाही, परिपक्वता नाही, वैचारिक पातळी नाही आणि म्हणूनच भरकटल्यामुले  भौतिक विश्वात पदार्पण करतात, त्याचा भाग होतात आणि तिथेच आयुष्य संपवतात.

Thursday, February 3, 2011

बरेचदा अनाकलनियच !!

समुद्रकिनाऱ्या वरील रेतीचे कण असो वा एखाद्या प्रसंगातील सांगतांना निसटलेले क्षण असो;
धबधब्यातुन पडणाऱ्या पाण्यातुन विखुरलेले तुषार असो वा एकांतात निघालेले विचार असो;
चिंताक्रांत होउन डोक्यावर पडलेल्या वळ्या असो किंवा सौम्य स्मिताच्या खळ्या असो;
एखादा लागलेला शोध असो किंवा झालेला बोध असो;
नकळत भेटलेली नजर असो वा मुद्दाम केलेला गजर असो;
निश्वासाचा श्वास असो वा विश्वसाचा भास असो;
 प्रितीचा सुगंध असो किंवा अन्यायाचा बंध असो;
जीवनाचा काठ असो किंवा गुरूंचा पाठ असो;
                                           सर्वच अनाकलनीय...अतुलनीय...कधीच हातात न येणारे....

Wednesday, February 2, 2011

"मी" पण..

आयुष्यात सगळ काही "मी" करू शकतो असा गोड़ गैरसमज असलेली लोक असतात पण थोड्या  आवक्याबाहेर असणाऱ्या किंबहुना समजण्यापलिकडे असणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात जिकडे "मी" मीरवताना दुर्लक्ष होते...

ज्या प्रमाणे कोणाच्या पोटी जन्म घ्यावा ह्याचा हक्क मनुष्याला नाही त्याच प्रमाणे मरणाबद्दलचा सुध्हा. जशा जन्म अणि मृत्यु ह्या गोष्टी प्रत्येकावर थोपवल्या जातात  त्याच प्रमाणे 'आयुष्य', वैयक्तिक जीवन, एकटेपण, जबाबदाऱ्या, विचार, मैत्री, नाते, बंधने अशा बऱ्याच गोष्टी माणसावर लादल्या जातात. त्यातली प्रत्येक गोष्ट लादलीच जाते असे नाही पण यातली प्रत्येक गोष्ट किंवा एका पेक्षा जास्त गोष्टी कोणा ना कोणा वर तरी लादल्या जातातच. बाकी गोष्टी माणुस स्वीकारतो किंवा त्याही स्वीकारण्यास भाग पडले जाते.  

अर्थात त्या लादलेल्या गोष्टींची किम्मत लादणाऱ्या पेक्षा ज्यावर लादल्या गेल्या तोच आयुष्यभर भरतो... इथे मनुष्याची या संदर्भातली दुर्बलता कळते... म्हणूनच माणुस नियती पुढे लाचारच असतो. त्याची जाणीव कोणाला असते कोणाला नसते, कोणी जाणीव करून घेतो व कोणी मुद्दाम त्या कड़े डोळेझाक करतो..

माणुस स्वतःहाचे भविष्य घडवतो म्हणजे काय?   निर्भिड होउन, प्रत्येक अडचणीना योग्य वेळी, योग्य निर्णय घेउन आलेल्या संधीला/ वेळेला सामोरे जातो आणि त्याचे फलित त्याला चांगले किंवा वाइट मिळते. आता भविष्य घडवले म्हणजे चांगलेच फळ. माणुस नेहमी 'मी' हा निर्णय घेतला, 'मी' असे केले - तसे केले , प्रयत्नांची पराकाष्ट केली अणि 'हे' घडवले याचा डंका मिरवतो. पण पराकाष्टा करण्या आधी जर नियतीने तुम्हाला ती संधीच नसती  दिली तर? अशा संधी, आधीच्या संधीच्या निवड़ी वर अवलंबून, प्रत्येक वेळी नियती आपल्याला देऊन आपल्या सोबत खेळ  खेळत असते. अणि आपण त्या खेळाचे निर्माते आपण असल्याच्या भासात आपण आयुष्यभर जगतो(?)...... 

Tuesday, February 1, 2011

महाराष्ट्राचा इतिहास !!

कालानुक्रमे :
i) प्रभु श्रीराम ३००० BCE (ख्रिस्त जन्मा पहिले) वर्षां पाहिले दंडकरण्या मधे आले
ii)  अशोक राजा ची राजधानी ( मगध साम्राज्य ) "सोपास" मुंबई च्या उत्तरेकडे 
iii) सातवाहन २३० BCE (ख्रिस्त जन्मा पाहिले) ते २२५ AD (ख्रिस्त जन्मा नंतर)
      त्या काळात महाराष्ट्राचे सांस्कृतिक महत्व वाढले वा प्रगति झाली. तेव्हा येथील भाषा "महाराष्ट्री" या नावाने      प्रचलित होती. त्या नंतर "मराठी" या नवत रूपांतर झाले. राजा गौतमी पुत्र "सत्कर्नि" ने शालिवाहन शक सुरु केले.

iv) वाकाटक राजा (विदर्भ राजा) २५० CE ते ५२५ CE
v) ७५३ CE नंतर राष्ट्रकुटाचे राज्य पूर्ण भारतभर पसरले  ९७३ CE पर्यंत.
vi) चालुक्य (बदामी राजधानी ) राष्ट्रकुटाचा पराभव करून राज्य करू लागले ११८९ CE  पर्यंत
vii) त्या नंतर देवगिरीचे यादव
viii) अल्लौद्दीन खिलजी व त्या नंतर मोहम्मद बिन तुघलकाने दख्हनचे पठार जिंकले (१३ वे शतक)
ix) १३५१ मधे तुघ्लाकाचा पराभव बहमनी सत्ते कडून (बहमनिंची राजधानी "गुलबर्गा")
x) बहमनिन्नी १५० वर्षांहून अधिक राज्य केले
xi) बहमनिंचा बीमोड आणि ५  शाह्यामधे  विभागणी
    १) निजामशाही (अहमदनगर) २) आदिलशाही (विजापुर) ३) क़ुतुबशाही (गोवलकोंदा)४) बीदरशाही (बीदर) ५) इमाद शाही (बेरार)
xii) १७ व्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सुरवात
xiii) शिवाजी राजे सफल व १६७४ मधे राज्याभिषेक
xiv) संभाजी राजे १६८० मधे सत्तेवर
xv) १७०८  मधे राजरामाचा पुतण्या आणि संभाजी चा पुत्र शाहू याने बालाजी विश्वनाथाला पेशवा केले
xvi) मराठे पूर्ण भारतात पसरले
    १) ग्वालियर=शिंदे  २) इंदौर=होळकर ३) बड़ोदा=गायकवाड ४)धर=पवार
xvii) पानिपतात मराठ्यांचा पराभव
xviii) १७७७ ते १८१८ पर्यंत ३ मराठे- इंग्रज युद्ध
xix) १८१९ मधे पेशवाई संपुष्टात

असच थोड प्रेमावरही, आवडलेलं

रोखले नयनत आसू,
मी शब्द ओठी रोखले.
पाहिले नाही तिला मी,
नजरेस माझ्या रोखले.
सांगुच का या संयमाला,
मी असा का सोसला ?
माहित होते मजला,
इंकार नसता सोसला....
                            वा. वा.

ओढ़...

भरतीच्या वेळी, खडकाळ समुद्र किनाऱ्यावर, खड़कावर आलेल्या पाण्याला, जसे, आहोटिच्या वेळी खाली गेलेल्या पाण्यात एकरूप होऊन, खळखळण्याची   ओढ़ असते; ती असते ओढ़ ...

स्वतःमधे नवचैतन्य  सामावण्यासाठी रक्त ज्या ओढीने ह्रदयाकडे जाते; ती ओढ़...

पोथी वाचत असताना दुधाचं भांड उघडं आहे समजल्यावर, पोथी लवकर संपण्याची ओढ़.. ती ओढ़ ....

एखाद्या मरणशैय्येवर पडलेल्या वादकाच्या डोळ्यात असलेली, वाद्याचा एकतरी स्वर ऐकण्याची केविलवाणी भावना आणि ती ऐकली नाही त होणारी मरणाकान्त तगतग, असते ओढ़... 

डग्ग्याचा नाद उमटल्यावर चाटीच्या आवाज ऐकण्याची आतुरता म्हणजे ओढ़..