विचार !! संपणारा असो वा न संपणारा .... कधी ना कधी टाकाऊ होतोच किंवा नाहीच असे नाही .. अर्थात काही अपवाद असतातच, दोन्हींसाठी ! बदल हा जसा निसर्गाचा नियम आहे तसाच तो जर विचारत झाला नाही त जसे लोखंड तसेच पडून कुजत राहिले त जन्गुन मातीत मिसळते आणि नामशेष होते तसेच विचाराचेही होते.
बऱ्याचदा बरच काही लिहिण्याची इच्छा असते पण कधी आळस त कधी टाळाटाळ, कधी सुचत नाही त कधी खरच काही तरी काम.... विचार हे नेहमी सुचत असतात, जबरदस्ती डोक्यात आणलेल्या गोष्टींना विचार मी म्हणणार(स्वतःचे) नाही. विचार उलगडले नाही त माणसाचा स्वभाव समजत नाही आणि स्वभाव समजला नाही त वाद-प्रतिवाद, समज-गैरसमज, अपेक्षा-उपेक्षा यात माणुस नकळत गोवल्या जातो.... आणि त्यामुळेच हा स्वतःला तुमच्या समोर उलगडण्याचा छोटा पण खुप जास्त प्रामाणिक प्रयत्न !! धन्यवाद् !!
Monday, January 31, 2011
प्रत्येकाचा नाइलाज !!!
प्रत्येक माणुस आपल्या जिवनातील एक तरी गोष्ट कधीच कोणाला सांगत नाही किंवा सांगू शकतच नाही. ती सर्वस्वी त्याचीच असते अथवा ती सर्वस्वी त्यालाच जीवन भर सहन करावी लागते. कितीही इच्छा असली तरी 'बंधने' आडवी येतात आणि तीच ओझ त्यालाच अगदी मृत्यु पर्यंत वाहव लागत... मग ती गोष्ट एखादा आयुष्यातल प्रसंग असो, पश्च्याताप असो, इच्छा असो, प्रेम असो, द्वेष असो, ह्रुदयावाराचा ओरखडा असो वा विचार असो.....
Subscribe to:
Posts (Atom)