Monday, January 31, 2011

विचार....

विचार !! संपणारा असो वा न संपणारा .... कधी ना कधी टाकाऊ होतोच किंवा नाहीच असे नाही .. अर्थात काही अपवाद असतातच, दोन्हींसाठी !  बदल हा जसा निसर्गाचा नियम आहे तसाच तो जर विचारत झाला नाही त जसे लोखंड तसेच पडून कुजत राहिले त जन्गुन मातीत मिसळते आणि नामशेष होते तसेच विचाराचेही होते. 

प्रत्येकाचा नाइलाज !!!

प्रत्येक माणुस आपल्या जिवनातील एक तरी गोष्ट कधीच कोणाला सांगत नाही किंवा सांगू शकतच नाही. ती सर्वस्वी त्याचीच असते अथवा ती सर्वस्वी त्यालाच जीवन भर सहन करावी लागते. कितीही इच्छा असली तरी 'बंधने' आडवी येतात आणि तीच ओझ त्यालाच अगदी मृत्यु पर्यंत वाहव लागत... मग ती गोष्ट एखादा आयुष्यातल प्रसंग असो, पश्च्याताप असो, इच्छा असो, प्रेम असो, द्वेष असो, ह्रुदयावाराचा ओरखडा असो वा विचार असो.....