Monday, January 12, 2015

असंच अस्ताव्यस्त...

आयुष्य हे "रिकामे" आणि "अर्थहीन" आहे. आपण जे आयुष्यात भरतो ते दिसते आणि जो अर्थ देतो तसे भासते !!!

प्रेमाचा अंकुर अविनाशी आहे आणि द्वेषाचा अंकुर विनाशी.

माणुस आयुष्यात सर्वात जास्त एकाच गोष्टीवर प्रेम करतो - त्याचा जीव. ते कळत असो वा नकळत.

आयुष्य जगण्याची सगळ्यात खालची पातळी म्हणजे आयुष्य "कारणांसह" जगणे, आणि उच्चतम पातळी म्हणजे आयुष्याला "कारण" असणे.





परतलो..


बरच हलक वाटत आहे… खूप दिवसांनी परतलो…  हरवलो होतो कि जगत होतो माहित नाही… बरच घडल, बरच दवडल, बरच खोडल… बरच मिळवलं, बरच गमवलं, बरच कमवलं… खुप विसरलो, खुप घसरलो… खुप सरावलो, खुप सुधरलो.

झेप घेतली आहे…क्षितीजा पलीकडे लक्ष्य आहे… प्रवास लांबचा आहे… सोबत तुमची आहे… भेटूच … !!