Showing posts with label नियती. Show all posts
Showing posts with label नियती. Show all posts

Thursday, May 10, 2012

प्रायश्चित्त

आयुष्यात कोणत्याही नात्यात, विचारात, परिस्थितीत निर्णयात कायमची पोकळी निर्माण करणारी गोष्ट म्हणजे "चूक". पोकळी या कारणाने कि, जरी चूक सुधरवली तरी चूक सुधरवण्यामुळे आयुष्यातील वाया गेलेल्या वेळेची पोकळी असो किंवा विचारात चूक गोवल्या गेल्यावर विचारात निर्माण होणारी पोकळी असो. एखाद्या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या तफावतीची पोकळी असो किंवा कोणत्याही नात्यात अनपेक्षित वागण्यामुळे झालेली पोकळी.
चूक हि कधी मुद्दाम केलेली, 'चूक' आहे अशी भासवलेली किंवा नकळत घडलेली असते. ती नेमकी काय आहे हे प्रत्येक व्यक्तींनी व्यक्तीनुरूप बदलवायच. निर्माण झालेल्या पोकळीचे कारण जशी "चूक" असते तशीच ती कोणालाही(स्वतःला किंवा दुसऱ्याला) कळल्यावर वाटणारी भीती सुद्धा असते. आता भीती कशाची? भीती कदाचित स्वतःचा खोटेपणा समोर यायची, कदाचित पात्रता नाही हे लोकाना कळेल याची अशा अनेक मूर्ख विचारांची. मुळात स्वताला शूर समजणारा मनुष्य किती छोट्या भावनांना किंवा विचारणा घाबरू शकतो याच हे उदाहरण.
ही पोकळी भरून काढण्याच सामर्थ्य जरी कशात नसाल तरी ती शक्यतोवर कमी करण्याच सामर्थ्य फक्त "प्रायश्चीत्तामध्ये" असत.

Monday, January 31, 2011

प्रत्येकाचा नाइलाज !!!

प्रत्येक माणुस आपल्या जिवनातील एक तरी गोष्ट कधीच कोणाला सांगत नाही किंवा सांगू शकतच नाही. ती सर्वस्वी त्याचीच असते अथवा ती सर्वस्वी त्यालाच जीवन भर सहन करावी लागते. कितीही इच्छा असली तरी 'बंधने' आडवी येतात आणि तीच ओझ त्यालाच अगदी मृत्यु पर्यंत वाहव लागत... मग ती गोष्ट एखादा आयुष्यातल प्रसंग असो, पश्च्याताप असो, इच्छा असो, प्रेम असो, द्वेष असो, ह्रुदयावाराचा ओरखडा असो वा विचार असो.....