आयुष्यात कोणत्याही नात्यात, विचारात, परिस्थितीत
निर्णयात कायमची पोकळी निर्माण करणारी गोष्ट म्हणजे "चूक". पोकळी या
कारणाने कि, जरी चूक सुधरवली तरी चूक सुधरवण्यामुळे आयुष्यातील वाया
गेलेल्या वेळेची
पोकळी असो किंवा विचारात चूक गोवल्या गेल्यावर विचारात निर्माण होणारी
पोकळी असो. एखाद्या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या तफावतीची पोकळी असो किंवा
कोणत्याही नात्यात अनपेक्षित वागण्यामुळे झालेली पोकळी.
चूक
हि कधी मुद्दाम केलेली, 'चूक' आहे अशी भासवलेली किंवा नकळत घडलेली असते.
ती नेमकी काय आहे हे प्रत्येक व्यक्तींनी व्यक्तीनुरूप बदलवायच.
निर्माण झालेल्या पोकळीचे कारण जशी "चूक" असते तशीच ती कोणालाही(स्वतःला
किंवा दुसऱ्याला) कळल्यावर वाटणारी भीती
सुद्धा असते. आता भीती कशाची? भीती कदाचित स्वतःचा खोटेपणा समोर यायची,
कदाचित पात्रता नाही हे लोकाना कळेल याची अशा अनेक मूर्ख विचारांची. मुळात
स्वताला शूर समजणारा मनुष्य किती छोट्या भावनांना किंवा विचारणा घाबरू शकतो
याच हे उदाहरण.
ही पोकळी भरून काढण्याच सामर्थ्य जरी कशात नसाल तरी ती शक्यतोवर कमी करण्याच सामर्थ्य फक्त "प्रायश्चीत्तामध्ये" असत.
No comments:
Post a Comment