Monday, February 14, 2011

इच्छा

आयुष्या संपण्यावर आले तरी इच्छांची यादी काही संपत नाही. तसे पाहिले त त्यावेळीही "जगावं" हि इच्छाच. शेवटी इच्छा हि कधी शेवटची नसतेच. ती पूर्ण झाली कि नवीन पण शेवटची(?) इच्छा तयार होते. पण मग ती शेवटची असल्याने सर्वांसाठी जे त्या इच्छेशी निगडीत आहेत त्यांवर बंधनकारक. बर असे असूनही शेवटच्या इछेची खासियत अशी कि कमाल वेळेस दुसऱ्याच्या इछेचा बळी घेऊनच तिचा जन्म होतो.
नवल याचं कि पिंड दानाच्या वेळी, कावळा शिवला हे एखाद्याच्या इच्छापुरती चे द्योतक. तसं पाहिले तर एखादी इच्छापूर्ती हि दुसऱ्या इछेची जन्मवेळ. मनुष्याचं मन एवढ सैरावैरा धावते कि त्यात कोणत्या इछेचा कधी जन्म होईल हे सांगण तितकच कठीण जेवढ कोणत्याही गोष्टीचे भविष्य.  कोणत्याही इच्छेची खोली सांगण कठीण जशी डोळ्यातली खोली सांगण. कोणत्याही इछेची वेदना सांगण तेवढाच कठीण जेवढी अथांग सागराची.

No comments:

Post a Comment