Friday, February 4, 2011

संध्याकाळ

जीवनतील काही चुकून झालेल्या, काही 'समजुन' केलेल्या 'चुकां' बद्दल बरेचदा वाईट वाटते. अर्थात ही गोष्ट सगळे सांगत नसतील तरी सगळ्यांनाच त्याचे वाईट वाटत असते. फक्त चुकां बद्दलच नव्हे तर आपल्या कमी पडलेल्या प्रयत्नांची आठवण
झाल्यावर असो किंवा अपयशा बद्दल असो, खोट बोलाव लागलं त्यापेक्षाहि  काहीही कारणास्तव खोट बोललो असेल त्याबद्दल असो किंवा कोणाला निरपेक्ष केले असेल त्याबद्दल असो. अशा साठी  प्रत्येक इसमाला उभ्या हयातित कधी ना कधी वाईट वाटतेच. ज्या प्रमाणे सुर्याच्या उष्णतेची सर सकाळपासून रात्रि पर्यंत, उत्तरायणा पासून दक्षिणायना पर्यंत बदलत जाते तसेच माणसाच्या मनोबलाची, अहंकाराची , भावनेची अणि हिम्मतिची सर कमी जास्त होतेच. आणि बांध कधी ना कधी तुटतोच. त्या वेळेस जवळच्या वाटणाऱ्या  दोनच गोष्टी; पहिली आई अणि दुसरी एकांत, निरागस संध्याकाळ !!

दिवसाच्या प्रत्येक प्रहरामधे एक वेगळी शक्ति असते, एक वेगळा आनंद असतो, वेगवेगळ्या विषयावर बोलण्याची ताकत असते. पण जीवनातिल प्रत्येक क्षणाशी, तो आनंदाचा असो वा दुखाचा, प्रणयाचा असो वा विरहाचा, किंवा केलेल्या चुकीचा असो त्या विषयी आपल्याशी बोलण्याची ताकत फक्त एकाच प्रहारत असते अणि तो प्रहर म्हणजे संध्याकाळ !

कधी व्यथा मनस्थितीत अशाच संध्याकाळी पाणावलेल्या डोळ्यांनी सुर्यनारायाणाकडे बघत असतांना एक विचार चमकून जातो की आसवांचा थोडा कमी ओघ वाहण्यासाठी त हा सूर्य रोज संध्याकाली प्रेमळ होत नसेल ना? त्याचा तो शेंदरी  रंग जे त्यागाच प्रतिक आहे  ते "तुझे दुःख त्यागुन दे" हे त खुणावत नसेल?

3 comments:

  1. masta re... Khara aahe Viyush! Sandhyakali aani Sakali surya khup premal hoto... Ithe mi eka diwshi sakali uthun baslo ekda... tar aai kamala lagli sakali ki dhuna bhijawte na tasla was yayla lagla... asa watla ki aaichya bangdyancha awaj aiku yeil... pan ithe asa kahich nasta yaar... asach lihit raha mitra!

    ReplyDelete
  2. खास, भाऊ माफ़ करा शब्द संपले !!!!

    ReplyDelete
  3. वियुश
    मला ही संध्याकाळ फार आवडली .. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी .. पण तुझ्यासारखा एखादाच ... तिला समोर जाणारा ... !!!!!!
    मस्त मस्त आणि मस्त !!!!
    रंजन ....

    ReplyDelete